या विभागाकडे सर्व जिल्हातील प्राथमिक शाळातील शिक्षकांचे प्रशासनाची जबाबदारी असुन,
त्याच प्रमाणे पर्यवेक्षण, नियंत्रण व मुल्यमापनाची ही जबाबदारी पर्यवेक्षकीय यंत्रणेकडे
आहे. जिल्हा परिषद शाळा, खाजगी प्राथमिक शाळा हया विभागाकडे आहे.
तालुक्यातील प्रत्येक गांवांमध्ये शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणे हे शासनाचे धोरण
असुन त्याकरिता शिक्षण विभाग वचनबध्द आहे. 6 ते 14 वयोगटातील प्रत्येक मुलं शाळेत दाखल
करून घेण्यासाठी, सर्व शिक्षकांनी अथक प्रयत्न करावेत. हे अभिप्रेत असुन गांव पातळीवरील
ग्राम शिक्षण समितीच्या सहकार्याने हे मोलाचे काम केले जाते.
या विभागामार्फत विद्यार्थ्याच्या कल्याणाकरिता अनेक योजना राबविल्या जातात. त्यामध्ये
जिल्हा क्रिडा स्पर्धा, विज्ञान प्रदर्शनी, गणवेष व लेखन साहित्य, उपस्थिती भत्ता,
शालेय पोषण आहार योजना, शिष्यवृत्ती, इत्यादी. जे विद्यार्थ्यी नियमित शाळेत दाखल होण्यास
असमर्थ आहेत, अशा विद्यार्थ्यांकरिता महात्मा फुले शिक्षण हमी योजना, वस्ती शाळा इ.
वैशिष्टय पुर्ण व नाविन्य पुर्ण पर्यायी शिक्षणाची व्यवस्था या विभागा मार्फत करण्यात
येते.
शालेय व्यवस्थापना मध्ये प्राथमिक शिक्षणाचे सार्वत्रिकरण करण्यासाठी 'सर्व शिक्षण
मोहिम' हि योजना या विभागाकडुन राबविल्या जात असुन सन 2010 पर्यत 6 ते 14 वयोगटातील
सर्व मुलांना उपयुक्त आणि दर्जेदार प्राथमिक शिक्षणाची सुविधा पुरविणे हे या योजनेचे
प्रमुख उद्दिष्ट आहे. तसेच इ.स.2010 पर्यत सर्व मूला मुलींना टिकवून ठेवणे हे या योजनेचे
प्रमुख धेय आहे.